शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
2
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
3
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
4
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
5
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
6
IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी
7
कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली...
8
1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा
9
हृदयद्रावक! बॉलिंगनंतर पाणी प्यायला, उलटी होताच बेशुद्ध होऊन खाली पडला, मैदानावरच मृत्यू
10
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
11
Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
12
"या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू...", प्रिया मराठेच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीची भावुक पोस्ट
13
भारत इलेक्ट्रॉनिक्स ते पॉलीकॅब... 'या' ५ स्टॉक्सवर ब्रोकरेज 'बुलिश'; आगामी काळात तगडा परतावा देणार?
14
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
15
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
16
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
17
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
18
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
19
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
20
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

फडणवीस, चंद्रकांतदादा हेच खरे लाभार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 00:27 IST

विटा : ‘मी लाभार्र्थी’च्या खोट्या जाहिराती करून सरकार जनतेला बधिर करीत आहे. जनतेने मते व सत्ता दिल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील हेच खरे सरकारचे लाभार्थी आहेत, अशी घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.खानापूर तालुक्यातील कार्वे (विटा) येथे रविवारी पार पडलेल्या शेतकरी संवाद मेळाव्यात ते बोलत ...

विटा : ‘मी लाभार्र्थी’च्या खोट्या जाहिराती करून सरकार जनतेला बधिर करीत आहे. जनतेने मते व सत्ता दिल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील हेच खरे सरकारचे लाभार्थी आहेत, अशी घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.खानापूर तालुक्यातील कार्वे (विटा) येथे रविवारी पार पडलेल्या शेतकरी संवाद मेळाव्यात ते बोलत होते.यावेळी जलसंपदामंत्री विजय शिवतारे, आ. अनिल बाबर, खासदार गजानन कीर्तीकर, नितीन बानुगडे-पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास बाबर, अमोल बाबर, संजय विभूते, आनंदराव पवार उपस्थित होते.ठाकरे म्हणाले की, जनतेसाठी अच्छे दिन येतील म्हणून भाजपला पाठिंबा दिला. तीन वर्षे झाली. आता मी जेव्हा फिरतोय तेव्हा वाटायला लागले आहे की, ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्टÑ माझा?’ महाराष्टÑाची पूर्वीपेक्षा वाईट परिस्थिती झाली आहे. १९९५ च्या जुन्याच पाणी योजना अजून पूर्ण करायचे काम सुरू आहे. महाराष्टÑात नवीन काही तरी घडेल म्हणून जनतेने सरकार बदलले; पण परिस्थिती बदलली नाही. ती बदलायची असेल तर सांगली जिल्हा भगवा करा. मी महाराष्टÑ भगवा करतो. मला मुख्यमंत्री व्हायचे नाही; पण एक ना एक दिवस मी शिवसेनेचा मुख्यमंत्री राज्यात बसविणारच आहे. शेतकºयांचे प्रश्न लोकशाही मार्गाने सुटले नाहीत तर रस्त्यावर उतरण्याची तयारी आहे.ठाकरे म्हणाले, सरकारला नीट सल्ले देणारे कोणी नाही. वीजदर कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविली जाते. हे शेतकºयांचे सरकार आहे की नाही? शेतकºयांच्या आत्महत्या होत आहेत. हे महाराष्टÑाला भूषणावह नाही. भाजपचे सरकार थोतांड असल्याने शेतकरी मुख्यमंत्र्यांपेक्षा माझ्याकडे समस्यांचे ओझे घेऊन मोठ्या अपेक्षेने येत आहेत. शेतकºयांना न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.आ. अनिल बाबर म्हणाले की, आमच्या मतदारसंघात १३ हजार शेतीपंपांची वीज कनेक्शन मिळाली नाहीत. टेंभू योजना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. शेतकºयांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारमध्ये शिवसेनेचा दबावगट तयार करून वीज, शेती, पाणी, आदी प्रश्न सोडविण्याची भूमिका शिवसेनेने सभागृहात घेतली पाहिजे. यावेळी निवास पाटील, दिनकर पाटील, शीतल बाबर, सभापती मनीषा बागल, उपसभापती बाळासाहेब नलवडे, महावीर शिंदे, शेखर माने यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.‘अनिलभाऊंना ताकद द्या’जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास बाबर म्हणाले, शिवसेनेत प्रवेश केला, त्यावेळी पक्षाचा आमदार देण्याची ग्वाही आम्ही दिली होती. आता सांगली जिल्ह्यात आ. अनिलभाऊ बाबर यांच्या रूपाने शिवसेनेचे एकमेव आमदार आहेत. त्यामुळे आम्हाला सर्वजण त्रास देत आहेत. त्यामुळे ठाकरेंनी आ. बाबर यांना ताकद द्यावी.ंं

टॅग्स :Politicsराजकारण